For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

बॉलिवूड गाजवलं, पण शेवट झाला खूपच वाईट...; 'या' कलाकारांचे झाले प्रचंड हाल

06:31 PM Aug 04, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
बॉलिवूड गाजवलं  पण शेवट झाला खूपच वाईट      या  कलाकारांचे झाले प्रचंड हाल
बॉलिवूड गाजवलं, पण शेवट झाला खूपच वाईट…; ‘या’ कलाकारांचे झाले प्रचंड हाल
Advertisement

मनोरंजन विश्वातून बुधवारी (2 जुलै) एक धक्कादायक बातमी समोर आली. ज्याने सर्वानाच मोठा धक्का बसला. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमधील ND स्टुडीओमध्ये गळफास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जात बुडाल्याने नितीन यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्यावर 180 कोटी रुपयांचे कर्ज होते, असे सांगितले जातेय. यासाठी त्यांनी त्यांची मालमत्ताही गहाण ठेवली होती. पण त्रासाला कंटाळून त्यांनी हे शेवटचं पाऊल उचललं. (Bollywood Celebrities who Were in limelight but got into trouble and ruined their careers)

Advertisement Whatsapp share

चाळीत राहून सामान्य जीवन जगणाऱ्या नितीन देसाईंनी एकेकाळी स्टुडिओ बांधण्याचे स्वप्न पाहिले होते जिथे उत्तम चित्रपटांचे चित्रीकरण होईल. यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि मोठं नाव कमावलं. पण त्या स्टुडिओत ते स्वत:च आत्महत्त्या करतील असं कुणाच्याही मनी-ध्यानी नव्हतं. गरिबीतून दिवस काढत त्यांनी आपल्या ध्येयाची उंची गाठली.

Advertisement

राहुल गांधींना 2024 ची निवडणूक लढवता येणार का? कोर्टाच्या निर्णयाचा अर्थ काय?

त्यांच्यासारखेच असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी उंची तर गाठली पण नंतर थेट जमिनीवर कोसळले. वाईट काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण अनेकजण शहाणपणाने निर्णय घेऊन पुढे जातात, तर काहीजण हताश होऊन मृत्यूला कवटाळतात. असेच काही बॉलिवूडमधील कलाकार आहेत जे कष्टाने पैसा आणि प्रसिद्धी मिळवूनही संकटात अडकले आणि त्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले.

Advertisement सब्सक्राइब करा

एके हंगल: 'इतना सन्नाटा क्यों है भाई...', तुम्हाला शोले चित्रपटातील हा डायलॉग आठवत असेल, तर तुम्हाला एके हंगलही आठवतील. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. आयुष्यात जवळपास 225 चित्रपट केले, खूप प्रसिद्धी मिळवली. पण अंतिम काळात त्यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. वाढत्या वयामुळे त्यांनी काम करणं बंद केलं. ते आजारी असायचे. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेही शिल्लक नव्हते. त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या मुलालाही नोकरी गमवावी लागली. अमिताभ बच्चन यांनी त्यांना 20 लाख रुपयांची मदत केल्याचे बोलले जाते.

Supreme Court: राहुल गांधींच्या बाजूने निकाल, संजय राऊतांचं थेट मोदी-शाहांना चॅलेंज!

भगवान दादा: चित्रपटांमध्ये पहिल्यांदाच बॉडी डबलचा वापर फक्त भगवान दादांमुळेच झाला. सेटवर शूटिंगसाठी खऱ्या नोटांचा पाऊस पाडणारे ते अभिनेता होते. राज कपूर त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा मायकेल डगलस म्हणत. कापड गिरणीत काम करणाऱ्या भगवान दादांनी आपल्या मेहनतीने नाव मिळवत आणि कोट्यवधींची संपत्ती कमावली. पण जुहू येथील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या कोट्यवधींच्या बंगल्यातून भगवान दादांना अंतिम काळ चाळीत घालवावा लागला. कारण त्यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी बंगला-गाडी-संपत्ती गहाण ठेवली होती. अशा स्थितीत ना चित्रपट बनला ना त्यांचे नशीब चमकले. नंतर त्यांना दारूचे व्यसन लागले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना प्राण गमवावे लागले.

Advertisement

विमी: अभिनेत्री विमीला बॉलिवूडच्या जगात खूप प्रसिद्धी मिळाली, परंतु तिचे वैयक्तिक आयुष्य वाईट परिस्थितीत गेले, ज्याची कल्पना करणे कठीण आहे. तिला ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं होतं, त्यानेच तिला दारूचे व्यसन लावले आणि वेश्याव्यवसायाकडे ढकलले. 10 वर्षात फिल्मी करिअर उद्ध्वस्त झाले, त्यामुळे विमीला तिचे आयुष्य गरिबीत एकटे घालवावे लागले. 3 सुपरहिट चित्रपटानंतर विमीचे सर्व चित्रपट फ्लॉप झाले. यानंतर तिला काम मिळणं बंद झालं. शेवटच्या क्षणी तिची अवस्था अशी झाली की तिला कोणीही पाहणारं नव्हतं. वयाच्या 34 व्या वर्षी विमीला अनेक दिवस हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. मृत्यू झाला तेव्हा तिला स्मशानभूमीत नेणारंही कोणी नव्हतं. एका चहा विक्रेत्याच्या गाडीत ठेवून तिला स्मशानभूमीत नेण्यात आलं.

भारत भूषण : 60 रुपये महिना कमावणारा अभिनेता भारत भूषण एका वेळी कर्जबाजारी झाले. सुरुवातीला भाईचारा, सावन, जन्माष्टमी, बैजू बावरा, मिर्झा गालिब अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. काही वर्षातच त्यांनी मुंबईत अनेक बंगले आणि महागड्या गाड्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी चित्रपटांची निर्मिती सुरू केली. पहिले दोन चित्रपट सुपरहिट झाले, पण नंतरच्या फ्लॉप चित्रपटांनी त्यांना गरीबीच्या मार्गावर आणले. भारत कर्जात बुडाले. 10 ऑक्टोबर 1992 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी भारतभूषण यांनी जगाचा निरोप घेतला.

Rahul Gandhi Conviction : राहुल गांधींना ‘सर्वोच्च’ दिलासा! पुन्हा होणार खासदार

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज