For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Tulsi Vivah 2023 Date : 23 की 24 नोव्हेंबर... तुळशी विवाह नेमका कोणत्या दिवशी?

02:55 PM Nov 17, 2023 IST | भागवत हिरेकर
tulsi vivah 2023 date   23 की 24 नोव्हेंबर    तुळशी विवाह नेमका कोणत्या दिवशी
tulsi vivah 2023 date and time in marathi : तुळशीविवाह कोणत्या तारखेला कधी आहे, कशी करायची पूजा?
Advertisement

Tulsi Vivah 2023 in Marathi : हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी देवउठणी एकादशी साजरी केली जाते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुळशी विवाहाचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी तुळशीचा विवाह शालिग्रामशी होतो. तुळशीविवाह करणार्‍याला जेवढे पुण्य कन्यादानातून मिळते तेवढेच पुण्य तुळशी लग्नाने मिळते, असे मानले जाते. खरंतर, शाळीग्राम भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. पण, मग यंदा तुळशी विवाह नेमका कोणत्या दिवशी आहे... चला तर मग जाणून घेऊया तुळशीमातेचा विवाह कोणत्या शुभ मुहूर्तावर करायचा? (tulsi vivah 2023 date and time)

Advertisement Whatsapp share

तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त (Tulsi Vivah 2023 Muhurat)

देवउठणी एकादशीला चातुर्मास संपतो. यानंतर तुळशी-शाळीग्राम विवाह पार पडतो. तुळशी विवाहाच्या दिवशी द्वादशी तिथी 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.०1 वाजता सुरू होईल आणि 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.06 वाजता समाप्त होईल. जन्मतारखेनुसार तुळशीचा विवाह यावेळी 24 नोव्हेंबरलाच होणार आहे.

Advertisement

हे ही वाचा >> ‘नाना पाटेकरांचा चाहता, पण…’, टपली खालेल्या तरूणाने सांगितलं नेमकं काय घडलं?

यावेळी तुळशी विवाहासाठी अनेक शुभ मुहूर्त सांगितले जात आहेत. या दिवशी तुळशी विवाहाची वेळ सायंकाळी 5.25 पासून सुरू होईल. याशिवाय सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, सिद्धी योग देखील आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

सर्वार्थ सिद्धी योग - दिवसभर
अमृत सिद्धी योग – सकाळी 6.51 ते दुपारी 4.01
सिद्धी योग – सकाळी 9.05

तुळशी विवाहाची पूजा पद्धत (Tulsi Vivah Puja)

एका खांबावर तुळशीचे रोप आणि दुसऱ्या खांबावर शाळीग्राम लावा. त्यांच्या शेजारी पाण्याने भरलेला कलश ठेवावा आणि त्यावर पाच आंब्याची पाने ठेवा. तुळशीच्या भांड्यात गेरू लावा आणि तुपाचा दिवा लावा. तुळशी आणि शाळीग्रामवर गंगाजल शिंपडा आणि रोळी आणि चंदन तिलक लावा. तुळशीच्या भांड्यातच उसाचा मंडप करावा. आता तुळशीला लग्नाचे प्रतीक असलेल्या लाल चुनरीने झाकून टाका. भांडे साडीत गुंडाळा, बांगड्या अर्पण करा आणि वधूप्रमाणे सजवा. यानंतर पदासह शालिग्राम हातात घेऊन तुळशीची सात वेळा प्रदक्षिणा केली जाते. यानंतर आरती करावी. तुळशीविवाह संपल्यानंतर सर्व लोकांना प्रसाद वाटला जातो.

Advertisement

हे ही वाचा >> ‘काल जे घडलं तो ट्रेलर, 2024 ला….’ संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

तुळशी विवाहाचे महत्त्व

तुळशी विवाह करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती तुळशीचा विवाह भगवान विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामशी करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्याला भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो. तुळशीविवाह हे कन्यादानाइतकेच पुण्यपूर्ण मानले जाते. तुळशीविवाह करणार्‍यांना वैवाहिक सुख मिळते असे म्हणतात.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज