For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Manoj Jarange : अन्न-पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? मृत्यू होऊ शकतो का?

04:09 PM Nov 02, 2023 IST | भागवत हिरेकर
manoj jarange   अन्न पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो  मृत्यू होऊ शकतो का
अन्न आणि पाणी सोडल्यानंतर माणूस किती दिवस जगू शकतो? किती दिवसानंतर होऊ शकतो मृत्यू?
Advertisement

Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगे यांनी आधी अन्नाचा त्याग केला, नंतर काही काळ पाणीही सोडले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होतेय. पण, अन्नाशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? किंवा अन्न आणि पाणी या दोन्हींशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? यावर शास्त्रज्ञ सतत काम करत आहेत. एक अंदाज असा आहे की लोक पाण्याशिवाय 2 दिवस ते एक आठवडा जगू शकतात.

Advertisement Whatsapp share

इतरही काही कारणं आहेत जे माणूस पाण्याशिवाय किती दिवस जिवंत राहू शकतो, हे ठरवतात. जसं की, गरम कारमध्ये अडकलेले किंवा अति उष्णतेमध्ये व्यायाम करणारे लोक काही तासांत डिहायड्रेट (शरीरातील पाणी कमी होणे) होऊ शकतात. किंवा जास्त वजन असलेली व्यक्ती जास्त काळ जिवंत शकते.

Advertisement

अन्न-पाण्याशिवाय काय होत... वेगवेगळे आहेत टप्पे

वॉशिंग्टन विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ रँडल पॅकर यांनी यावर संशोधन केले आहे. त्यात असे आढळून आले की अतिशय उष्ण वातावरणात प्रौढ व्यक्तीच्या शरीरातून 1 ते 1.5 लिटर पाणी घामाच्या स्वरूपात शरीरातून बाहेर पडते. या काळात पाणी न मिळाल्यास निर्जलीकरणाचा (शरीरातील पाणी कमी होणे) पहिला टप्पा येतो. यामुळे तहान लागते, ही गरज भागवण्यासाठी शरीर वेगाने ऑक्सिजन पंप करते आणि शरीराच्या वजनाच्या 2% पर्यंत खर्च होतो, पण हे दिसून येत नाही.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >> Maratha Reservation : आरक्षण आंदोलनात भाजप फसलं? समजून घ्या राजकारण

दुसऱ्या टप्प्यात दिसू लागतात लक्षणे

थकवा आणि डोकेदुखी सुरू होते. तसेच लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. मूत्रपिंडातून मूत्राशयात कमी पाणी पोहोचते, त्यामुळे लघवीचा रंग गडद होतो. घाम येणे कमी होऊ लागते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. हा इशाराच असतो. म्हणजे रक्त घट्ट होत आहे. ऑक्सिजनची पातळी राखण्यासाठी हृदय आता वेगाने काम करते. यावेळी आपल्या शरीराच्या वजनाच्या 4% पर्यंत कमी होते. त्यामुळे बीपी कमी होऊन चक्कर येते.

तिसरा टप्पा अत्यंत धोकादायक

यामध्ये, शरीराचे वजन 7% कमी होते. बीपी समतोल राहत नाही, अशा स्थितीत शरीर जिवंत ठेवण्यासाठी हृदय एक निर्णय घेते. त्यामुळे मूत्रपिंडासारख्या महत्वाच्या नसलेल्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो. यात ह्रदय त्याच्या बाजूने योग्य काम करते, परंतु यामुळे अवयव खराब होण्याचा धोका असतो. याला तीव्र ट्यूबलर नेक्रोसिस म्हणतात. जर मीठ आणि पाण्याचा पुरवठा नसेल तर मल्टीऑर्गन फेल्युअर (अनेक अवयव बंद होतात) होऊ शकते.

Advertisement

हे ही वाचा >> ि

माणूस किती दिवस राहू शकतो जिवंत?

माणूस पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो, याबद्दल अद्याप तरी खात्रीशीर माहिती नाही. पाणी आणि अन्नाशिवाय सर्वात जास्त काळ जगण्याचा विक्रम 18 वर्षीय अँड्रियास मिहेवेझच्या नावावर आहे. ऑस्ट्रियाच्या अँड्रियासला एका पोलीस अधिकाऱ्याने पकडले आणि एका कोठडीत ठेवले आणि नंतर रजेवर गेला होता. पोलीस कोठडीत कुणी बंद केल्याचे त्याला आठवत नव्हते. पुढे गिनीज अँड्रियासला बुकमध्येही स्थान मिळाले. असे बरेच लोक आहेत जे बराच काळ पाण्याशिवाय जगले, परंतु त्यांनी नंतर सांगितले की त्यांनी स्वतःचे मूत्र पिण्यास सुरु केले होते.

प्रकृती पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी किती वेळ लागतो?

जर तुम्ही पाण्याशिवाय राहिलात आणि पहिल्या टप्प्यात असाल, तर शरीर पाणी प्यायल्यानंतर काही तासांत सक्रिय होते. पण शरीराचे वजन ४% वर गेलेले असल्यास रुग्णालयात दाखल करावे लागते. यानंतरही तो बरा होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात.

उपोषण थांबवणेही आहे धोकादायक

उपोषणही कमी जीवघेणे नाही. यामध्येही शरीर वेगाने साथ सोडायला लागते. उपोषण बराच काळ चालू राहिल्यास, रिफीडिंग सिंड्रोमचा धोका असतो. असे घडते जेव्हा उपोषण थांबवल्यानंतर एखादी व्यक्ती ताबडतोब भरपूर खाणे आणि पिणे सुरू करते. यामुळे इलेक्ट्रोलाइट्समध्ये चढ-उतार होतात, ज्यामुळे हृदय आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो. यामुळेच उपवास सोडल्यानंतर लगेच भरपूर खाण्याऐवजी हळूहळू पोषण आहार घेण्याचा सल्ला तज्ञ देतात.

लोक का करतात अन्न पाण्याशिवाय उपोषण?

अन्न-पाणी सोडण्याचे इतके धोके असताना, लोक आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा मार्ग का निवडतात? हे केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही आहे. उदाहरणार्थ, रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांनी तुरुंगात उपोषण केले जेव्हा त्यांची वैद्यकीय सेवेची मागणी पूर्ण झाली नाही. सलग 24 दिवस ते उपाशी राहिले.

यामागचे कारण सोपे आहे. संपाची घोषणा झाली की त्याचा थेट दबाव सरकारवर येतो. हा दबाव कोणत्याही तोडफोडीपेक्षा अधिक प्रभावी आहे. याचा थेट संबंध लोकांच्या भावनांशी जोडला जातो. अशा स्थितीत उपोषण करत असलेल्या व्यक्तीला काही झाले तर प्रकरण हिंसक होऊ शकते याची भीती सरकारला वाटते. ही पद्धत केवळ पक्षांमध्ये किंवा लोकांमध्येच नव्हे तर सामान्य घरांमध्ये देखील अनेक वेळा स्वीकारली गेली आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज