For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Supreme Court:'The Kerala Story' चित्रपटावर बंदीची मागणी, नव्या वादाला फुटणार तोंड?

06:31 PM May 03, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
supreme court  the kerala story  चित्रपटावर बंदीची मागणी  नव्या वादाला फुटणार तोंड
Advertisement

The Kerala Story : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या चित्रपटावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘याचिकाकर्ते केरळ उच्च न्यायालयात जाऊ शकतात. कारण हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होत आहे. त्यामुळेच उच्च न्यायालय या प्रकरणावर लवकरच सुनावणी करू शकते आणि त्यावर विचार करू शकते.’

Advertisement Whatsapp share

केरळमधील 32,000 बेपत्ता मुलींची ही कथा आहे, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे, ज्यांचे प्रथम ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले. नंतर त्याला ISIS शी जोडून दहशतवादी बनवण्यात आले.

Advertisement

शरद पवारांनी दिले वेगळेच संकेत; ‘त्या’ विधानाचा अर्थ काय?

‘द केरळ स्टोरी’विरोधातील आंदोलन संपणार!

‘द केरळ स्टोरी’वरून वाद सुरू आहे. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. ‘द केरळ स्टोरी’बाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालय प्रत्येक प्रकरणात उपाय म्हणून येऊ शकत नाही. याप्रकरणी उच्च न्यायालयात ही जाऊ शकता.’

Advertisement सब्सक्राइब करा

‘द केरळ स्टोरी’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री अदा शर्मा विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या चित्रपटात नर्स बनू इच्छिणाऱ्या मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. पण ती ISIS ची दहशतवादी बनते. ‘द केरळ स्टोरी’च्या ट्रेलरमध्ये ब्रेन वॉश, लव्ह जिहाद, हिजाब आणि ISIS सारखे शब्द वापरण्यात आले आहेत. हा चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात आहे. याचिकेत ‘द केरळ स्टोरी’वर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार राहणार की जाणार?, ‘या’ तारखेला होणार निर्णय

सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानुसार चित्रपटात हे बदल करण्यात आले…

‘द केरळ स्टोरी’ बाबतच्या गदारोळात त्याला सेन्सॉर बोर्डाने ए सर्टिफिकेट दिले आहे. यासोबतच चित्रपटातून दहा वादग्रस्त दृश्ये हटवण्यात आली आहेत. केरळचे माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतानंदन यांचे विधान ‘द केरळ स्टोरी’मधून काढून टाकण्यात आले आहे, ज्यात ते म्हणाले होते की, ‘दोन दशकांत केरळ मुस्लिम लोकसंख्या असलेले राज्य बनेल. कारण तरुणांना इस्लामसाठी प्रभावित केले जात आहे.

Advertisement

चित्रपटातून ते दृश्यही काढून टाकण्यात आले आहे, ज्यामध्ये हिंदू देव चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला होता. ‘भारतीय कम्युनिस्ट हे सर्वात मोठे ढोंगी आहेत’ या चित्रपटातील संवादातून भारतीय हा शब्दही काढून टाकण्यात आला आहे.

शिर्डी हादरलं! सख्ख्या भावानेच केली अल्पवयीन बहिणीची निर्घृण हत्या

जेव्हा चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांना विचारण्यात आले की हा प्रचारात्मक चित्रपट आहे का? यावर ते म्हणाले, ‘मला वाटतं जेव्हा वादविवाद संपतो तेव्हा हा प्रचार चित्रपट आहे असं म्हणणं खूप सोपं आहे. जे लोक म्हणतात की हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे, त्यापैकी कोणीही हा चित्रपट पाहिला नाही. पाहण्याआधीच हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे हे निश्चित झाले.’

चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना चित्रपट बनवताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले याविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘मी समस्यांबद्दल बोलत नाही. आम्ही आमच्या आवडीने गेलो.’ 5 मे रोजी थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आहेत आणि निर्माता विपुल अमृतलाल शाह आहेत.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज