For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Lok Sahba 2024: "मविआला 31 ते 33, तर महायुतीला 15 ते 17 जागा मिळणार"

05:34 PM Nov 09, 2023 IST | भागवत हिरेकर
lok sahba 2024   मविआला 31 ते 33  तर महायुतीला 15 ते 17 जागा मिळणार
लोकसभा निवडणुकीत महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याबद्दल जितेंद्र आव्हाडांनी केलं भाकित
Advertisement

2024 lok sabha election prediction : लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा गुलाल उधळण्यासाठी भाजपकडून परिश्रम घेतले जाताहेत. दुसरीकडे दोन गटात विभागल्या गेलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही मोर्चेबांधणी सुरू केलीये. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकसभा निवडणुकीतील निकालाबद्दल मोठं भाकित केलं आहे.

Advertisement Whatsapp share

लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून पक्ष बळकटी आणि लोकसभा मतदारसंघ बांधणीवर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला वा आघाडीला किती यश मिळू शकतं, याचेही अंदाजे बांधले जात आहेत.

Advertisement

महायुतीला 15 ते 17 जागा मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलंय. दिल्लीतील सट्टाबाजारातील चर्चेचा हवाला देत आव्हाडांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीबद्दल हे राजकीय भाकित केलं आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय की, "दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारात आज सहज काही लोकांशी बोलत होतो. महाराष्ट्राच्या बाबतीतले त्यांचे अंदाज ऐकून मला स्वत:लाच धक्का बसला. त्यांचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडीला 31 ते 33 जागा मिळतील आणि महायुती (भाजपा, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट) यांना 15 ते 17 जागा मिळतील."

हे ही वाचा >> “तुमची मस्ती…”, तानाजी सावंतांवर जरांगे भडकले, काय घडलं?

"येणाऱ्या काळात या 5 राज्यातील निवडणूकींचा परिणाम हा संपूर्ण देशभरात दिसू लागेल आणि ह्या 5 राज्यांचा त्यांचा अंदाज असा आहे की, 5 पैकी कमीत-कमी 4 राज्ये काँग्रेस जिंकेल. राहुल गांधींची जोरदार हवा आहे", असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

Advertisement

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती

राज्यात 2019 नंतर राजकारण बदलून गेले आहे. 2019 नंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसोबत घरोबा केला होता. शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना पुन्हा भाजपासोबत आली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचाही एक मोठा गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आहे.

हे ही वाचा >> मंडल विरुद्ध कमंडल! भाजप पुन्हा अडवाणींचा फॉर्म्युला स्वीकारणार?

महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेली असून, 2024 लोकसभा निवडणुकीत महायुती आणि आघाडीची कसोटी लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर भाजप काँग्रेस अधिक वरचढ झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जागा वाटप आणि एकत्रित निवडणूका लढवणे कसरतीचं ठरण्याची शक्यता दिसत आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज