For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Virat-Rohit : भरमैदानात कोहली-रोहितमध्ये खडाजंगी, व्हिडीओ व्हायरल

09:07 PM Oct 22, 2023 IST | mahadev kamble
virat rohit    भरमैदानात कोहली रोहितमध्ये खडाजंगी  व्हिडीओ व्हायरल
न्यूझीलंडची धावसंख्या 19 पर्यंत जात होती तोच त्यांनी दोन विकेटही घेतल्या होत्या. त्याच सामन्यात 9 व्या षटकात दुसरी विकेट मिळाल्यानंतर टीम इंडिया एका विकेटसाठी मात्र त्यावेळी हतबल झालेली दिसून येत होती.
Advertisement

Virat-Rohit :  भारतीय क्रिकटे संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अनेकदा भारताच्या सामन्यावेळी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अनेक सूचना देत असतो. हे आता सर्वपरिचित आहे. भारताकडून एकदा न्यूझीलंडमध्ये 19 धावांमध्ये दोन विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर टाकले होते. तर त्याचवेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती. कोहली आपलं मत सांगण्यासाठी तिथे गेला होता. मात्र तिथे रोहितनेही आपलं मत व्यक्त केले. त्यानंतर मात्र कोहली सामन्यावेळी आपल्या फिल्डिंगला निघून गेला. तोच व्हिडीओ आता आयसीसीकडून पोस्ट करण्यात आला आहे.

Advertisement Whatsapp share

व्हिडीओ व्हायरल

सामन्यावेळी भारतीय संघाचे 31 वे षटक संपले होते. त्यावेळी विराट कोहली धावत धावत रोहित शर्माकडे गेला होता. त्यावेळी तो अतिशय गंभीरपणे मत मांडताना दिसत होता. त्यावेळी रोहितने आधी त्याचे म्हणणे आधी ऐकून घेतले आणि त्याकडे नंतर दुर्लक्ष केले. पण त्यानंतर त्यानेही कोहलीसमोर आपले मत व्यक्त केले होते. त्यावर कोहली अगदी शांत शांत दिसला होता. मात्र तो क्षेत्ररक्षणासाठीही निघून जाताना दिसून आला. या घटनेचाही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Advertisement

हे ही वाचा >> Dalip Tahil Case : एक चूक अन् अभिनेत्याला तुरुंगवासाची शिक्षा, 2018 चं प्रकरण काय?

 

Advertisement सब्सक्राइब करा

टीम हतबल

त्या सामन्यादरम्यान रोहित शर्माने धरमशालामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर न्यूझीलंडची धावसंख्या 19 पर्यंत जात होती तोच त्यांनी दोन विकेटही घेतल्या होत्या. त्याच सामन्यात 9 व्या षटकात दुसरी विकेट मिळाल्यानंतर टीम इंडिया एका विकेटसाठी मात्र त्यावेळी हतबल झालेली दिसून येत होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

ब्रेकमध्ये घडलं नाट्य

रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली होती. यावेळी भारताला विकेट मिळत नव्हते आणि 31व्या षटकानंतर ब्रेकमध्येच रोहित आणि कोहली यांच्यातील झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. आणि त्या घटनेनंतर शमीने डावाच्या 34 व्या षटकात रवींद्रला बाद केले होते. रचिनने 87 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 75 धावा केल्या होत्या. त्याच सामन्यात न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल शतक झळकावून त्या संघाने 43 षटकात 4 गडी गमावून 232 धावांचा टप्पा गाठला होता.

हे ही वाचा >> डेटिंग अ‍ॅपवर भेट, 3 दिवस कारमध्ये ठेवला मृतदेह; ‘त्या’ हत्येची Inside Story

 

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज